| Photo | Name | Designation | Mobile |
|---|
केंद्र शासन , महारष्ट्र शासन व नगर परिषद संचालनालय , मुंबई यांच्या संयुक्तपणे शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ची सुरवात महाराष्ट्रामध्ये दिनांक २८ ऑगस्ट २०१४ पासून करण्यात आली आहे. या अभियानामध्ये मुख्यत्वाने ६ घटक आहेत. या मध्ये सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी, कौशल्य प्रशिक्षण द्वारे रोजगारांची उपलब्धता , क्षमता बांधणी व प्रशिक्षण, स्वयंरोजगार कार्यक्रम , फेरीवाल्यांना सहाय्य आणि शहरी बेघरांसाठी निवारा या सर्व घट बाबतची विस्तृत माहिती खालील प्रमाणे आहे.
योजनेचे सहा घटक पुढील प्रमाणे :-
१. सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी महिला बचत गट स्थापन करणे .
२. कौशल्य प्रशिक्ष्णद्वारे रोजगाराची उपलब्धता विविध विषयाचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण
३. स्वयंरोजगार कार्यक्रम, समूह उद्योग कर्ज ,महिला बचत गटाची जोडणी
४. शहरी बेघरांना निवारा (shelter to urban street homeless) बेघर लोकांकरिता निवारा केंद्राची निर्मिती करणे.
५. फेरीवाल्यांना सहाय्य (Support to urban street vendors) शहरातील फेरीवाले , पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून शासकीय योजनांचा लाभ देणे.
६. क्षमता बांधणी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे .
७. संस्कृती शहर उपजीविका केंद्र (Sanskruti city livehood center) शहरातील नागरिकांना विविध सेवांचा पुरवठा करणे व महिला बचत गटांना उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करणे.
८. प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना पथविक्रेत्यांना छोट्या व्यवसायासाठी १० हजार, २० हजार आर्थिक पुरवठा करणे.
९. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बचत गटांना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योगासंबंधात प्रती सदस्य ४० हजार प्रमाणे ४ लाखापर्यंत कमी व्याजदर कर्ज उपलब्ध करून देणे , शहरातील लाभार्थी, महिला बचत गट , मुलभूत पायाभूत सुविधा इत्यादींना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेंतर्गत ३५% अनुदान या धर्तीवर कर्ज पुरवठा करणे.
No files uploaded.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358